Friday, 28 November 2014

गडकिल्ल्यांचे आधुनिक राखणदार

****प्रवीण दाभोळकर********
 किल्ल्यांचा आदर करणारी एक नवी पिढी आपल्याला सध्या पाहायला मिळतेज्यांना हा गौरवशाली इतिहासगडकिल्ल्यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवायची आहे. गडकिल्ल्यांचे जतन,संवर्धन करायचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ही मंडळी पुरातत्त्व विभागाच्या मदतीने गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेचेडागडुजीचे काम करीत असतात. गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावकऱ्यांना स्वच्छतेचेशिक्षणाचे महत्त्व पटवून देत असतात. हेच गडकिल्ल्यांचे आधुनिक राखणदार आहेत.डकिल्ले हे महाराष्ट्राची शान आहेत. हिंदवी स्वराज्याच्या काळात स्वसंरक्षणासाठीरसद गोळा करण्यासाठीशत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी असलेले हे गडकिल्ले. ही शान अबाधित राहावी म्हणून छत्रपती शिवरायांसोबत असंख्य शूरवीर मावळयांनी आपले प्राण पणाला लावले. हे गडकिल्ले जिंकण्यासाठी बाजीप्रभूतानाजी अशा सिंहासारख्या शूरवीरांना वीरगती प्राप्त झाली. तीन-चार शतकांपूर्वी बांधलेले गडकिल्ले अजूनही शाबूत आहेतयावरून त्या वेळच्या भक्कम बांधकामाची व्यवस्थातेव्हाच्या अभियंत्यांच्या कलेचा,कौशल्याचा अंदाज बांधता येईल. हे गडकिल्ले जिंकण्यासाठीटिकविण्यासाठी मावळयांनी वेळप्रसंगी प्राणंाची आहुती दिली. त्यातूनच आपल्याला वैभवशाली इतिहासाचा वारसा मिळाला. मात्र आताचारशे-साडेचारशे वर्षे ऊन-पाऊस-वारा यांचा मारा सहन केल्यामुळे यातील बहुतेक किल्ल्यांचे बुरूज ढासळू लागले आहेत. निव्वळ पर्यटक म्हणून जाणाऱ्यांना वर्षानुवर्षे या किल्ल्यांची दुरवस्था बहुधा कधी कळलीच नसावी. गडकिल्ल्यांवर गेल्यावर किल्ला स्वत:च्या मालकीचा असल्याचा आविर्भाव आणतआपले व आपल्या जोडीदाराचे नाव लिहिणेखाण्यापिण्याच्या वस्तूप्लॅस्टिक बाटल्या गडकिल्ल्यांवर इतरत्र फेकणेअशा गोष्टी करतात.
कधीकाळी बांधलेले हे दुर्ग ढासळल्याने तेथे आता पाहण्यासारखे काही नसेल असेही काही जणांना वाटते. पण हे गडकिल्लेच मराठयांच्या इतिहासाचे गौरवशाली साक्षीदार आहेत. पुढील पिढयांना अभिमानाने सांगाव्या अशा अनेक घटना या किल्ल्यांवर घडल्या आहेत. किल्ल्याचा बालेकिल्लाकिल्ल्याची रचनातिथले तट-बुरूजबुलंद दरवाजेचोरवाटामाचीतिथली देवळे अशा अनेक गोष्टी किल्ल्यांवर जाऊन पाहण्यासारख्या असतात. या किल्ल्यांचा आदर करणारी एक नवी पिढी आपल्याला सध्या पाहायला मिळतेज्यांना हा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या या गडकिल्ल्यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवायची आहे. गडकिल्ल्यांचे जतनसंवर्धन करायचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ही मंडळी पुरातत्त्व विभागाच्या मदतीने गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेचेपुनर्बांधणीचे काम करीत असतात. गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावकऱ्यांना स्वच्छतेचेशिक्षणाचे महत्त्व पटवून देत असतात. हेच गडकिल्ल्यांचे खरे रखवालदार आहेत.
महाराष्ट्रात गडकिल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढत इतिहासाच्या प्रेमापोटी काही शिवप्रेमीगडप्रेमी मंडळी गडकिल्ल्यांना भेटी देत असतात. तिथे जाऊन स्वच्छतेबद्दल जगजागृतीस्वत: पुढाकार घेऊन साफसफाई करीत असतात. गडकिल्ल्यांची डागडुजीतिथे नियमित साफसफाई केलीव त्यांना पर्यटनस्थळांची मान्यता मिळालीतर अनेक पर्यटक अशा ठिकाणी भेटी देऊ शकतात. बहुतेक गडप्रेमी गट अनेकदा बहुचर्चित गडांना भेटी देत असतात. इतरांना सोबत नेऊन त्या गडासंबधी माहिती देणेसाफसफाईस्वच्छता करणे असे उपक्रम राबविले जात असतात. पण आजही अनेक गडकिल्ले दुर्लक्षित आहेतज्यांच्याबद्दल अनेक जणांना जास्त माहिती नाही.


मुंबईतील 
'दुर्गवीर प्रतिष्ठानया सेवाभावी संस्थेमार्फत अशा दुर्लक्षित गडकिल्ल्यांना वारंवार भेट दिली जाते. गेली आठ वर्षे नियमितपणे दुर्गसंवर्धनाचे काम चालू आहे. माहुली किल्ल्यापासून दुर्गवीरच्या गडप्रेमींनी या कार्यक्रमाला सुरुवात केली. मुंबई-गोवा महामार्गाजवळील माणगावपासून 17-18 कि.मी. अंतरावर असणाऱ्या माणगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानने काम सुरू केले. त्याचबरोबर नागोठण्यापासून ते 10 कि.मी. अंतरावरील खांब या ठिकाणी असलेल्या सुरगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम चालू आहे. मुंबईतील 50, साताऱ्याहून 10 ते 12, कोल्हापूरपुणे या शहरातूनही अनेक मंडळींनी दुर्गवीरच्या चळवळीत आपला सहभाग घेतला. गेल्या सात-आठ महिन्यांपासून दिवेगडसाताऱ्यातील वर्धनगड या ठिकाणीही संस्थेने काम सुरू केले आहे. ''गडकिल्ले संवर्धनासाठी साहित्य संमेलनसांस्कृतिक सण साजरे करतोमहाराष्ट्र दिनानिमित्त इतिहासाला उजाळा देतोकिल्ले संवर्धन करताना किल्ल्याच्या मूळ बांधकामाला हात लागू नयेवेगळे बांधकाम होऊ नये अशा पुरातत्त्व विभागाच्या अटींचे आम्ही पालन करीत असतो. पुरातत्त्व विभागाने गडप्रेमी संस्थांना सोबत घेतलेतर भविष्यात चांगले काम होऊ शकते,'' असे दुर्गवीरचे अजित राणे सांगतात. जमा झालेल्या निधीतून गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावकऱ्यांना शैक्षणिक साहित्यही पुरविले जाते. गडकिल्ल्यांवर भेटी देताना काढलेल्या छायाचित्रांचेजुन्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यासाठीही दुर्गवीर संस्था प्रयत्नशील असते.
गडकिल्ल्यांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक संस्थेचे एक वेगळे वैशिष्टय आहे. एकमेकांशी स्पर्धा न करता या सर्व संस्था एकत्र येऊन शिवकालीन इतिहास टिकविण्याच्यातो इतिहास पुढच्या पिढीत रुजविण्याच्या मोहिमेला हातभार लावतात. 'गडवाटया संस्थेने गडकिल्ले संवर्धनासाठी काम करणाऱ्या वेगवेगळया 22 संस्थांना एकत्र करून रायगडावर महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी प्रकाशव्यवस्था असावी अशी मागणी केली. पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने स्वच्छताडागडुजी केली. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला. महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी दिवा लावून प्रत्येक सणांची सुरुवात करण्याचा गडवाटचा प्रयत्न असतो,असे सचिव विशाल पेडणेकर सांगतात. प्रत्येक गडकिल्ल्यांवर चौकी पहारा असावायासाठी 'गडवाटनेहमी प्रयत्नशील असते. निव्वळ सहलीसाठी जाणारी असंख्य मंडळी किल्ल्यापर्यंत गाडया नेऊन दारूच्या पाटर्या करतात. यासाठी येथे स्थानिक रहिवाशांनी चौकी उभारावी यासाठी 'गडवाट'चे कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. किल्ल्यांवर येणाऱ्या गाडयांची पाहणी करून मद्य नेण्यास बंदी केलीतरच गडकिल्ल्यांवर सहलीसाठी येणाऱ्या मंडळींवर जरब बसू शकते. आपल्याला कोणी बोलणारे नाही म्हणून गडकिल्ल्यांवर सररास पाटर्या केल्या जातातयाला वेळीच आळा बसला पाहिजे. संस्थेमार्फत 

अनेक मंडळींना सोबत नेऊन त्या गडकिल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले जाते. गडवाटच्या सुरुवातीच्या दिवसात ठरावीक पाच ते सात किल्ल्यांना भेटी द्यायचे ठरविले होते. त्याप्रमाणे कार्यक्रमाचा एक भाग व इतरांना सोबत घेता यावे म्हणून सोशल मीडियावर या कार्यक्रमाची माहिती टाकण्यात आली. याला सर्व ठिकाणांहून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईपुणेनाशिकसातारा अशा शहरांतून गडप्रेमी सहभागी झाले. स्थानिकांना सोबत घेऊन राजगड पाली दरवाजाच्या निखळलेल्या पायऱ्या मातीने भरून काढत गडसंवर्धनाची मोहीम गडवाटने यशस्वीपणे राबविली.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात राहणाऱ्या संतोष माने यांनी गडसंवर्धनासाठी 'गनिमी कावाया ग्रूपची स्थापना केली आहे. वेगवेगळया ग्रूप्सशी संलग् राहणाऱ्या संतोष यांनी इतिहासाचा वारसा असणाऱ्या पन्हाळयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या 13 मित्रांना घेऊन सात वर्षांपूर्वी 'गनिमी कावाया संस्थेची सुरुवात केली. एखाद्या ठिकाणी जाऊन इतिहासाबद्दल जागृती करणेलोकांमध्ये गडकिल्ल्यांबद्दल आत्मीयता निर्माण करणे अशी कामे गनिमी कावामार्फत केली जात असतात. जनतेला आपल्या इतिहासाची थोरवी आपण सांगू शकलोत्याचे महत्त्व उलगडून दाखवू शकलो तर ते गडकिल्ल्यांकडे वळतील व त्यांचे संवर्धन करतील या जाणिवेतून गनिमी कावाचे काम सातत्याने चालत आहे. पन्हाळगडपावनखिंडविशालगडदुर्लक्षित असलेला मुठागड या किल्ल्यांवर त्यांनी आतापर्यंत विशेष मोहीम राबविली आहे. आजही काही किल्ल्यांची शासनदरबारी नोंद नाही. त्यांची नोंद झाली तरच त्यासाठी निधी मिळू शकतो व किल्ल्याच्या विकासासाठीची कामे होऊ शकतात. पुरातत्त्व विभागाला कायद्याच्या चौकटीत राहून सर्व कामे करावी लागतात. पुरातत्त्व विभागासोबत राहूनखास लक्ष देऊन सुरळीत कामे होऊ शकतात असा काही गडप्रेमींचा अनुभव आहे. गडकिल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना दुर्गसंवर्धनाबद्दल प्रबोधन व्हावेया उद्देशाने 'दुर्गसखाया संस्थेची स्थापना केली गेली. मकरंद केतकरमनोज चव्हाणअभिजित काळेचेतन राजगुरूसुबोध पाठक ही मंडळी दुर्गसखामार्फत प्रबोधनाचे काम यशस्वीरित्या करीत आहेत. संस्थेतर्फे दर वर्षी 'दुर्गअभ्यास भ्रमणआयोजित केले जाते. त्या कार्यक्रमादरम्यान गडावर हिंडताना इतिहास अभ्यासक सभासदांना दुर्गांची बलस्थाने व दुर्गांचा इतिहास उलगडून दाखवितात आणि प्रश्नोत्तरादरम्यान शंकांचे निरसन केले जाते. त्या कार्यक्रमाद्वारे राजगडरायगडपुरंदरप्रतापगडशिवनेरी-नाणेघाटसुधागड अशा दुर्गांचा अभ्यास केला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेगवेगळया आदिवासी पाडयांवरील शाळांमधून शिक्षण घेणारी गुणी आदिवासी मुले साक्षरेतेसोबत सुसंस्कृतही व्हावीम्हणून 'दुर्गसखात्या मुलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवीत असतात. त्यामध्ये पाडयांपासून शाळेपर्यंतच्या प्रवासासाठी सायकलीबौध्दिक विकासासाठी शैक्षणिक सीडी आणि दूरदर्शन संचसंगणक साक्षरतेसाठी काही निवडक शाळांमध्ये संगणकविद्यार्थी दत्तक योजनासुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य वाटप,दिवाळीत फराळ आणि फटाके यांचे वाटपगावकऱ्यांच्या आग्रहाखातर ग्रंथालयगरजूंना कपडेवाटप अशी अनेक समाजपयोगी कामे दुर्गसखामार्फत केली जात असतात.
शिवजयंतीप्रमाणेच राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करणाऱ्याही काही संस्था आहेत. शिवअस्मिता या सामाजिक शिवप्रेमी संस्थेमार्फत राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. राजमाता जन्मोत्सव साजरा करण्याचे संस्थेचे हे दुसरे वर्ष. यंदाही या संस्थेमार्फत राजमातांचा जन्मदिन किल्ले कोरीगडावर मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जानेवारी रोजी मुंबईहून कोरीगडाकडे जाण्यासाठी शिवअस्मिता संस्था मार्गक्रमण करणार आहे. या निमित्त गडावरील मंदिरांची साफसफाई,सुशोभीकरण तसेच मंदिराच्या आवारातील परिसरात रांगोळीची आरास करून राजमाता जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
किल्ल्यांची जपणूक व संवर्धन करताना प्राचीन लेण्यांची जपणूक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी डोंबिवलीतील पंकज समेळ या तरुणाने लेण्यांवर खास अभ्यास सुरू केलाआहे. 2006 साली सह्याद्री भ्रमण ग्रूपने राजगडरायगड या किल्ल्यांवर जाऊन साफसफाईचा उपक्रम सुरू केला. गडकिल्ल्यांबाबत सध्या अनेक संस्था जागरूक झाल्या आहेत. अशा वेळी लेण्यांकडे लक्ष द्यावे म्हणून पंकजने आपला मोर्चा लेण्यांकडे वळविला. लेणी आणि किल्ले एकमेकांचा परस्पर संबध सांगत असतात. पुरातन काळातील लोकांचे राहणीमानआभूषणे हे शिल्पात रेखाटण्याची कला वाखाणण्याजोगी आहे. यासाठी अभ्यासवर्ग घेऊन लेण्यांचे माहात्म्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा पंकजचा मानस आहे.

या ऐतिहासिक वास्तूंची जपणूक झालीस्थानिक याबाबत जागरूक झालेतर पर्यटन मार्गदर्शकस्थानिक दुकानदार यांना यातून रोजगार मिळू शकेल. गडांवरील कचराअस्वच्छता ही गंभीर समस्या होत आहे. पुरात्तत्व विभागाच्या कालबाह्य अटींचा फेरविचार व्हायला हवा. असे झाले तर स्वयंसेवी संस्थांना गडसंवर्धनाचे काम सजगतेने करता येईल. पर्यटकांनी गडकिल्ल्यांवर स्वच्छता ठेवायला हवीमंदिराप्रमाणे गडाचे पावित्र्य जपायला हवे. बहुतांश किल्ल्यांची पडझड झालेली सध्या दिसून येते व त्याकडे पुरातत्त्व विभागाचे झालेले दुर्लक्षही तेवढेच कारणीभूत आहेअसे काही गडप्रेमींचे गाऱ्हाणे असते. पण एखादी ऐतिहासिक वास्तू दुरुस्त करायची असेल तर ती वास्तू कोणत्या कालखंडात बांधली आहेत्याच्या जतनासाठी कोणत्या प्रकारचे बांधकाम योग्य असेल याचा सारासार विचार करणे ही तितकेच गरजेचे आहेअसे मत ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ आणि पुरातत्त्व विभागाचे निवृत्त संचालक अरविंद जामखेडकर यांनी व्यक्त केले. स्मारक दत्तक
योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्था अशी कामे करू शकतात. काही किल्ल्यांसाठी लागणारा निधी केंद्रातून येत असतो
तर काही किल्ल्यांवर राज्य सरकारचे नियंत्रण असते. एखाद्या वास्तूच्या डागडुजीसाठी व पुनर्बांधणीसाठी लागणारा निधी विशिष्ट खात्यात जमा करुन त्यावर संबंधित विभाग काम करतो किंवास्थापत्य विभागाकडे हे काम सोपविले जाते. सरकारस्थानिक माणसे काय करतात यापेक्षा आम्ही वेळात वेळ काढून गडकिल्ल्यांना भेटी देऊन तिथे स्वच्छताडागडुजी करतोअसे सामाजिक संस्थांचे सांगणे आहे. पुरातत्त्व विभागाने अशा सेवाभावी मंडळींची मदत घेत कार्य चालू ठेवलेतर या ऐतिहासिक वास्तूंची आपल्याला जपणूक करता येईल.
9773770507

एखादी ऐतिहासिक वास्तू दुरुस्त करायची असेल तर ती वास्तू कोणत्या कालखंडात बांधली आहेत्याच्या जतनासाठी कोणत्या प्रकारचे बांधकाम योग्य असेल याचा सारासार विचार करणेही तितकेच गरजेचे आहे. एखाद्या वास्तूच्या डागडुजी व पुनर्बांधणीसाठी लागणारा निधी विशिष्ट खात्यात जमा करून त्यावर संबंधित विभाग काम करतो किंवास्थापत्य विभागाकडे हे काम सोपविले जाते.
अरविंद जामखेडकर (ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ आणि पुरातत्त्व विभागाचे निवृत्त संचालक)

Monday, 3 November 2014

एमडी महाविद्यालयाची 'स्वप्नपूर्ती'

*****प्रवीण दाभोळकर*****


चार वर्षांपूर्वी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात त्या वेळी शिकणारे प्रवीण भिकले व प्रशांत माने या समाजसेवेची आवड असणाऱ्या तरुणांनी प्रकल्पाला सुरूवात केली. दर रविवारी पदपथावर राहणाऱ्या मुलांना परळच्या एम.डी. महाविद्यालयात आणायचे आणि शिकवायचे हा यामागचा उद्देश होता. चिमुरडयांच्या स्वप्नांना नवे पंख मिळावे म्हणून या प्रकल्पाला'स्वप्नपूर्तीहे नाव दिले गेले. 2010 साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'स्वप्नपूर्तीया प्रकल्पाचा शुभारंभ झाला. सध्या 'स्वप्नपूर्तीया प्रकल्पाला चार वर्षे उलटून गेली आहेत. या प्रकल्पामध्ये शिवडीलालबाग-परळ या विभागातील झोपडपट्टीतील मुलांना सहभागी करून घेतले आहे. महानगरपालिकेच्या शाळेत काही मुलांची नावे नोंदवण्यात आली आहेत. अगोदर शिकत असलेल्या मुलांच्या प्रगतीविषयी वारंवार माहिती घेतली जाते. या अनोख्या,आगळयावेगळया प्रकल्पाला अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिकेही मिळाली आहेत.
मुंबईत रस्त्याने प्रवास करताना प्रत्येक सिग्नलवर लहान मुले भीक मागताना दिसतात. अशा वेळी त्या लहान मुलांना कोणी शाळेचे-शिक्षणाचे महत्त्व सांगितलेतर ते ऐकण्याच्या मानसिकतेत मुळीच नसतात. काही दिवसांपूर्वीच परळ नाक्याच्या सिग्नलवर सलीम नावाचा 8-9 वर्षाचा एक मुलगा भीक मागत होता. त्याची विचारपूस केल्यावर कळले की वांद्रयाच्या झोपडपट्टीत तो राहतो व रोज तिथून इथे भीक मागायला येतो. त्याला कोणी इथे पाठवलेघरातले कुठे असतात अशी माहिती सांगणे तो जाणीवपूर्वक टाळत होता. शिक्षणाबद्दल काही ऐकून घेण्याची त्याची इच्छाच नव्हती. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात रहदारीच्या सगळयाच रस्त्यांवर काही लहान मुले भीक मागताना आपल्याला सररास दिसतात. रस्त्यावरच्या या लहान मुलांचे आयुष्य आणि शिक्षणाची स्थिती गंभीर आहेहे वास्तव नाकारता येत नाही.

चार वर्षांपूर्वी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात त्या वेळी शिकणारे प्रवीण भिकले व प्रशांत माने या तरुण विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड होती. रस्त्यावरच्या मुलांना अक्षरओळख करून देण्याची संकल्पना दोघांच्या मनात आली. काळाचौकीला पदपथावर अशी झोपडपट्टी आहे, असे महाविद्यालयातील मैत्रीण धनश्री माने हिने त्यांना सांगितले. दररोज महाविद्यालयात जाताना वाटेवर दिसणारी अशी मुले त्यांचे नेहमी लक्ष वेधून घ्यायची. प्रवीण आणि प्रशांत यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवायचे ठरवले. काळाचौकी पोलीस ठाण्याजवळील श्रावण यशवंते चौकात गेल्या काही वर्षांपासून काही कुटुंबे झोपडयांमध्ये राहतातहे त्यांनी पाहिले. भंगाराच्या बदल्यात लसूण विकणे हा इथल्या स्त्रियांचा प्रमुख व्यवसाय. दारू पिणाऱ्या नवऱ्यांमुळे संध्याकाळी घरी रोज भांडणमारझोड हे ठरलेलेच. पदपथावरचा महानगरपालिकेचा दिवा हाच त्यांच्यासाठी प्रकाशाचा काय तो एकमेव स्रोत. या झोपडयांमध्ये मिळून पंधरा वर्षाखालची जवळजवळ 10 ते 12 मुले आहेत. त्यातील काही जण जवळच्या महानगरपालिकेच्या शाळेत जाततर उरलेली मुले नुसत्याच उनाडक्या करीत असत. मग कधी त्यांच्या आईसोबत खांद्यावर पिशवी टाकून लसूण विकायला जायचेतिथेच कोणी काय देईल ते खायचेतर कधी दिवसभर भटकत राहायचे. जवळ कुठे जत्रा असेल तर घोळक्याने जत्रेत जायचेफिरायचेकोणाकडे तरी खायला मागायचे आणि जिवाची मुंबई करायची. सर्वसाधारण घरात शिकणाऱ्या मुलांपेक्षा अनेक कला यांना अवगत असतात. रस्ता कसा पार करायचा हे इतर मुलांना शिकवावे लागतेपण पदपथावरच्या या मुलांना याची एवढी सवय झालेली असते की गाडया चुकवत चुकवत गाडीचा वेग पकडून ते सराईतपणे रस्ता पार करीत असतात. चेहरा केविलवाणा करून खायला मागायचीबऱ्याचदा आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची अजब कला त्यांच्यामध्ये दिसून येते. वरकरणी साधीसरळ दिसणारी ही मुले बेरक्या वृत्तीची होती. यांची दिनचर्या आणि ते नेमके कुठे राहतातकाय करतात याची माहिती काढण्यासाठी त्यांनी मुलांवर पाळत ठेवली. खाण्याचे आमिष दाखवूनही ही मुले शिक्षण घ्यायला तयार होणारी नव्हतीअसे त्यांच्या निदर्शनास आले. समोरच्याकडून खायचे काढून घेऊन त्यांच्या हातावर तुरी देऊन पळण्यात ते पटाईत होते.
या मुलांना शिकवायचे असेलतर त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याची गरज होती. काही वाईट सवयी असल्या तरी मुलांमध्ये शिक्षणाबद्दल उदासीनता आहेअसे प्रवीण व प्रशांत यांना कधीच वाटले नाही. अखेर मुलांच्या पालकांना जाऊन समजवायचे ठरले. पालकांना भेटून या विद्यार्थ्यांना अनपेक्षित धक्का बसला. मुलांना कितीही शिकवले तरी त्यांना भीकच मागावी लागणार आहेअशी त्या पालकांची मानसिकता पाहायला मिळाली. पण मुले जर शिकली तर स्वत:च्या पायावर उभी राहू शकतीलस्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकतील हे समजावताना विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ यायचे. दारूमुळे तर्राट झालेल्या मुलांच्या वडिलांनी या शिक्षणाला नकार दिलापण कोणीतरी चांगली शिकलेली मुले काहीतरी चांगले सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असे त्या मुलांच्या आयांना वाटायला लागले. त्यांनी सहकार्याची भावना दाखवली. फक्त एकदा भेटूनविचारपूस करून हा प्रश्न मार्गी लागणारा नव्हता. अखेर हे शिवधनुष्य पेलायचे ठरलेच. प्रवीणप्रशांत यांच्यासोबत धनश्री माने व आणखी काही मित्रमंडळी या ध्येयपूर्तीसाठी कामाला लागली. वेळ मिळेल तसा यांच्या झोपडीत जाऊन विचारपूस करू लागली. पदपथावर मुलांच्या मांडीला मांडी लावून बसू लागली. धनश्री माने ही विद्यार्थिनी शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांच्या पाठयपुस्तकातला अभ्यासक्रम शिकवू लागली. प्रत्येक मुलाला नावाने ओळखू लागली. शाळेत न जाणारी व दिवसभर उनाडक्या करणारी शेजारची मुलेसुध्दा, 'ही काय नवी भानगड?' म्हणून येऊन बाजूला बसू लागली. असे अनेक दिवस गेले. येणारी-जाणारी माणसेबसची वाट बघणारी माणसे एक उत्सुकता म्हणून पाहत व निघून जात असत. इतर मुलांसारखे शिकवणी वर्ग या मुलांकडे नसल्याने मुलांनाही नवीन माणसाकडून काहीतरी शिकल्याचा आनंद मिळत होता. काही सुशिक्षित मुले आपल्या लेकरांना काहीतरी चांगले शिकवण्याचा प्रयत्न करत आहेतहे एव्हाना त्यांच्या पालकांना समजू लागले होते. पालकही आता मनमोकळेपणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधू लागले होते. पण या सगळया प्रकल्पात प्रवीण आणि प्रशांत यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. महाविद्यालयातला स्वत:चा अभ्यासघरातील कामेत्यात झोपडीमध्ये संध्याकाळी विजेची असलेली समस्याआजूबाजूची वर्दळ यामुळे मुलांना शिकवणे प्रवीणप्रशांत यांना थोडे कठीण वाटू लागले. यासाठी अपल्या मित्रमंडळींचीही मदत घेतली जाऊ शकतेअसा त्यांनी विचार केला. एम.डी. महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभाग वेगवेगळया सामाजिक उपक्रमांमुळे चांगलाच चर्चेत होता. सर्वांच्या सहकार्याने मुलांना शिकवण्याचे हे काम रा.से.यो.अंतर्गत स्वतंत्र प्रकल्प म्हणून पुढेदेखील सुरू ठेवण्याचा निश्चय केला. महाविद्यालयात मुलांना शिकवण्याच्या या प्रकल्पाला परवानगी मिळवण्यासाठी रा.से.यो.चे प्रा.डॉ.अविनाश कारंडे सर यांनी प्राचार्य घुले मॅडम यांच्याकडे मदत मागितली. प्राचार्यांनीही कोणतीही हरकत न घेता विद्यार्थ्यांच्या जबाबदारीवर या मुलांना महाविद्यालयात आणून शिकवण्याची परवानगी दिली.
काळाचौकी येथील झोपडपट्टीतील व आजूबाजूच्या परिसरातील दहा मुलांना नियमित शिकवायचेअसे ठरले. रा.से.यो.चे ठरावीक वीस विद्यार्थी या प्रकल्पावर काम करणार होते. पाच-पाचच्या गटाने दर रविवारी या मुलांना महाविद्यालयात आणायचे आणि शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच एखादी वस्तू बनवणेनृत्यसंगीतचित्रकला शिकवणे असे उपक्रम सुरू झाले. रस्त्यावरील या मुलांना अनेक वाईट सवयी होत्या. त्यातून त्यांना बाहेर काढणे मोठया जिकिरीचे काम होते.
दर रविवारी मुलांना परळला एम.डी. महाविद्यालयात आणले जायचे आणि शिकवले जायचे. चिमुरडयांच्या स्वप्नांना नवे पंख मिळावे म्हणून या प्रकल्पाला 'स्वप्नपूर्तीहे नाव दिले गेले. 2010 साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'स्वप्नपूर्तीया प्रकल्पाचा शुभारंभ झाला. त्या दिवशी शाळेत जाणारी मुले आपापल्या शालेय गणवेशासह महाविद्यालयात हजर झाली. महाविद्यालयात शिस्तीचे पालन करावे लागेलअसे त्यांना आधीच सांगितले गेले होते. सुरुवातीला काही क्षण कावऱ्याबावऱ्या नजरेने बघणारी ही मुले लगेच बोलती झाली. एकदा सांगितल्यावर पटापट आपल्या आवडीचे गाणे,अभिनय करून महाविद्यालयातील मुलांवर आपली छाप पाडत होते. गणेश नावाच्या मुलाने तर अमिताभ बच्चनसनी देओल अशा अभिनेत्यांची हुबेहूब नक्कल करत सर्वांना स्वत:च्या प्रेमात पाडले. विद्यार्थीही आ वासून हा सर्व प्रकार पाहायला लागले. मुलांना शिकवण्याची त्यांची उत्सुकता आणखी वाढू लागली. 'तुम्हाला काय व्हायचेय?' या प्रश्नावर अभिनेताडॉक्टरशिक्षक अशी उत्तरे मिळत होती. या मुलांची स्वप्ने पाहून या मुलांना शक्य तेवढी मदत करायचीअसे त्या दिवशी महाविद्यालयातील मुलांनीही ठरवले. मुले टॅक्सीतून उतरल्यावर त्यांना वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी शिपाईवर्गातला गावकर मामाही विद्यार्थ्यांना मदत करू लागला. मुलांनी नियमित यावेयासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या खाण्यापिण्याची,वह्यापुस्तकांची व्यवस्था केली. चांगले खायला मिळतेखेळायला मिळते म्हणून शाळेत न जाणारी बाकीची मुलेही येऊ लागली. आता स्वप्नपूर्ती प्रकल्पामध्ये एकूण वीस मुले-मुली येऊ लागली होती. एखाद्या रविवारी राणीबागेत किंवा जवळच्या नरेपार्क उद्यानात मुलांना खेळायला घेऊन जायचे. शिव्या देणे आणि मस्ती करणे यावर वचक बसणे गरजेचे होते. मग मुलांनीच एकमेकांवर लक्ष ठेवूनअजूनही कोण कोण शिव्या देतात त्यांची नावे रविवारी दादा-ताईंना सांगायची असे ठरले. मस्ती करणाऱ्यांना शिक्षा म्हणून एखादा रविवारी महाविद्यालयात आणायचेच नाहीमग पुढच्या रविवारी तो आपोआप शांत झालेला असायचा. अशा तऱ्हेने शिव्या आणि मस्ती आटोक्यात आणण्यात विद्यार्थ्यांना काही प्रमाणात यश आले.
आपल्या खिशातून रोज एक रुपयाची बचत करून या प्रकल्पासाठी निधी साठवायचाअसे रा.से.यो.च्या विद्यार्थ्यांनी ठरवले. तरीही जमा होणारी रक्कम अपुरी होती. मग महाविद्यालयातील इतर विषयांच्या प्राध्यापकांचे लेक्चर संपल्यावर त्यांना या प्रकल्पाबद्दल सांगायचे आणि शक्य तेवढया मदतीचे आवाहन करायचेअसे ठरवून मुले लेक्चरला बसायला लागली. शिक्षकांना आपले म्हणणे पटवून द्यायला लागली. फक्त शिकण्यासाठी म्हणूनच महाविद्यालयात येणारी ही मुले नाहीततर आपल्यासोबत इतरांनीही शिकावे याची यांना जाणीव आहेम्हणून इतर प्राध्यापकांनीही या प्रकल्पाला शक्य तेवढी मदत केली. स्वप्नपूर्तीच्या विद्यार्थ्यांना या मुलांकडूनही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. या प्रकल्पात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांवर सर्व प्राध्यापकांची विशेष नजर होतीज्यामुळे आपोआपच त्यांचा अभ्यासही होत गेला. स्वप्नपूर्ती प्रकल्पाची बातमी वर्तमानपत्रात छापून आली. कॉलेज कँटीनकट्टा यांवर स्वप्नपूर्तीची चर्चा होऊ लागली. काही जण प्रोत्साहन द्यायचेतर बरेच जण टिंगलही करायचे. मग 'रविवारी फिरणेमज्जा करणेसिनेमा बघणे यात वेळ न घालवता समाजसेवेसाठी तो वेळ देतोअसे स्वप्नपूर्तीचे कार्यकर्ते टिंगल करणाऱ्यांना सांगू लागले.

'स्वप्नपूर्तीया प्रकल्पाला चार वर्षे उलटून गेली आहेत. या प्रकल्पामध्ये शिवडीलालबाग-परळ या विभागातील झोपडपट्टीतील मुलांना सहभागी करून घेतले आहे. या प्रकल्पाची सुरुवात करणारा प्रवीण आता तामिळनाडूमध्येतर प्रशांत आसाममध्ये सेवाभावी संस्थेसाठी काम करत आहेत. फोनवरून,सामाज माध्यमांद्वारे स्वप्नपूर्ती प्रकल्पाविषयीची माहिती त्यांना मिळत असते. ती माहिती ऐकून नव्या विद्यार्थ्यांचे ते भरभरून कौतुक करतात. त्यांनी लावलेले हे बीज हळूहळू मोठे होत आहेयाचे त्यांना नेहमी समाधान वाटते. हितेश आखाडे हा रा.से.यो. स्वयंसेवक इतर स्वयंसेवकांच्या सोबतीने सध्या स्वप्नपूर्ती प्रकल्प सांभाळत आहे. बाबासाहेब भोसलेहर्षदा गलांडेवैष्णवी चव्हाणसौरभ गाडगेगणेश पवार अशी अनेक मुले दर रविवारी न चुकता एम.डी. महाविद्यालयात येतात.''आम्ही मुलांना काय शिकवतो त्यापेक्षा बऱ्याच चांगल्या गोष्टी मुलांकडून आम्हाला शिकायला मिळतातआम्हाला आमचे बालपण नव्याने जगायला मिळते'' असे प्रकल्प प्रमुख हितेश आखाडे सांगतो. काळाचौकीच्या महानगरपालिकेच्या शाळेत काही मुलांची नावे नोंदवण्यात आली आहेत. अगोदर शिकत असलेल्या मुलांच्या प्रगतीविषयी वारंवार माहिती घेतली जाते. या अनोख्याआगळयावेगळया प्रकल्पाला अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिकेही मिळाली आहेत.
एम.डी. महाविद्यालयाप्रमाणेच इतर महाविद्यालयात व काही रहिवासी इमारतींमध्येही असे प्रकल्प सुरू झाले आहेत. देशभरातीलतसेच मुंबईसारख्या शहरातील अनेक मुलांना शिक्षण घेणे शक्य नसते. आजच्या घडीला अनेक मोठमोठया संस्था बालमजूरबालहक्क अशा गंभीर विषयांवर काम करताना दिसतातज्यांना पुरेसा निधी उपलब्ध होतो. मात्र स्वप्नपूर्तीसारखा प्रकल्प आजही विद्यार्थ्यांच्या खिशातील पैशातूनच चालत असतो. पण सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या विद्यार्थ्यांना मुलांना शिकवण्यातच आनंद मिळतो. स्वप्नपूर्ती प्रकल्पात काम करणारे अनेक विद्यार्थी आजही आजूबाजूच्या परिसरात भीक मागणाऱ्या मुलांना ''कुठे राहतोसतुला शिकायला आवडेल का?'' असे विचारत असतात.
9773770507