Friday, 28 November 2014

गडकिल्ल्यांचे आधुनिक राखणदार

****प्रवीण दाभोळकर********
 किल्ल्यांचा आदर करणारी एक नवी पिढी आपल्याला सध्या पाहायला मिळतेज्यांना हा गौरवशाली इतिहासगडकिल्ल्यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवायची आहे. गडकिल्ल्यांचे जतन,संवर्धन करायचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ही मंडळी पुरातत्त्व विभागाच्या मदतीने गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेचेडागडुजीचे काम करीत असतात. गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावकऱ्यांना स्वच्छतेचेशिक्षणाचे महत्त्व पटवून देत असतात. हेच गडकिल्ल्यांचे आधुनिक राखणदार आहेत.डकिल्ले हे महाराष्ट्राची शान आहेत. हिंदवी स्वराज्याच्या काळात स्वसंरक्षणासाठीरसद गोळा करण्यासाठीशत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी असलेले हे गडकिल्ले. ही शान अबाधित राहावी म्हणून छत्रपती शिवरायांसोबत असंख्य शूरवीर मावळयांनी आपले प्राण पणाला लावले. हे गडकिल्ले जिंकण्यासाठी बाजीप्रभूतानाजी अशा सिंहासारख्या शूरवीरांना वीरगती प्राप्त झाली. तीन-चार शतकांपूर्वी बांधलेले गडकिल्ले अजूनही शाबूत आहेतयावरून त्या वेळच्या भक्कम बांधकामाची व्यवस्थातेव्हाच्या अभियंत्यांच्या कलेचा,कौशल्याचा अंदाज बांधता येईल. हे गडकिल्ले जिंकण्यासाठीटिकविण्यासाठी मावळयांनी वेळप्रसंगी प्राणंाची आहुती दिली. त्यातूनच आपल्याला वैभवशाली इतिहासाचा वारसा मिळाला. मात्र आताचारशे-साडेचारशे वर्षे ऊन-पाऊस-वारा यांचा मारा सहन केल्यामुळे यातील बहुतेक किल्ल्यांचे बुरूज ढासळू लागले आहेत. निव्वळ पर्यटक म्हणून जाणाऱ्यांना वर्षानुवर्षे या किल्ल्यांची दुरवस्था बहुधा कधी कळलीच नसावी. गडकिल्ल्यांवर गेल्यावर किल्ला स्वत:च्या मालकीचा असल्याचा आविर्भाव आणतआपले व आपल्या जोडीदाराचे नाव लिहिणेखाण्यापिण्याच्या वस्तूप्लॅस्टिक बाटल्या गडकिल्ल्यांवर इतरत्र फेकणेअशा गोष्टी करतात.
कधीकाळी बांधलेले हे दुर्ग ढासळल्याने तेथे आता पाहण्यासारखे काही नसेल असेही काही जणांना वाटते. पण हे गडकिल्लेच मराठयांच्या इतिहासाचे गौरवशाली साक्षीदार आहेत. पुढील पिढयांना अभिमानाने सांगाव्या अशा अनेक घटना या किल्ल्यांवर घडल्या आहेत. किल्ल्याचा बालेकिल्लाकिल्ल्याची रचनातिथले तट-बुरूजबुलंद दरवाजेचोरवाटामाचीतिथली देवळे अशा अनेक गोष्टी किल्ल्यांवर जाऊन पाहण्यासारख्या असतात. या किल्ल्यांचा आदर करणारी एक नवी पिढी आपल्याला सध्या पाहायला मिळतेज्यांना हा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या या गडकिल्ल्यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवायची आहे. गडकिल्ल्यांचे जतनसंवर्धन करायचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ही मंडळी पुरातत्त्व विभागाच्या मदतीने गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेचेपुनर्बांधणीचे काम करीत असतात. गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावकऱ्यांना स्वच्छतेचेशिक्षणाचे महत्त्व पटवून देत असतात. हेच गडकिल्ल्यांचे खरे रखवालदार आहेत.
महाराष्ट्रात गडकिल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढत इतिहासाच्या प्रेमापोटी काही शिवप्रेमीगडप्रेमी मंडळी गडकिल्ल्यांना भेटी देत असतात. तिथे जाऊन स्वच्छतेबद्दल जगजागृतीस्वत: पुढाकार घेऊन साफसफाई करीत असतात. गडकिल्ल्यांची डागडुजीतिथे नियमित साफसफाई केलीव त्यांना पर्यटनस्थळांची मान्यता मिळालीतर अनेक पर्यटक अशा ठिकाणी भेटी देऊ शकतात. बहुतेक गडप्रेमी गट अनेकदा बहुचर्चित गडांना भेटी देत असतात. इतरांना सोबत नेऊन त्या गडासंबधी माहिती देणेसाफसफाईस्वच्छता करणे असे उपक्रम राबविले जात असतात. पण आजही अनेक गडकिल्ले दुर्लक्षित आहेतज्यांच्याबद्दल अनेक जणांना जास्त माहिती नाही.


मुंबईतील 
'दुर्गवीर प्रतिष्ठानया सेवाभावी संस्थेमार्फत अशा दुर्लक्षित गडकिल्ल्यांना वारंवार भेट दिली जाते. गेली आठ वर्षे नियमितपणे दुर्गसंवर्धनाचे काम चालू आहे. माहुली किल्ल्यापासून दुर्गवीरच्या गडप्रेमींनी या कार्यक्रमाला सुरुवात केली. मुंबई-गोवा महामार्गाजवळील माणगावपासून 17-18 कि.मी. अंतरावर असणाऱ्या माणगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानने काम सुरू केले. त्याचबरोबर नागोठण्यापासून ते 10 कि.मी. अंतरावरील खांब या ठिकाणी असलेल्या सुरगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम चालू आहे. मुंबईतील 50, साताऱ्याहून 10 ते 12, कोल्हापूरपुणे या शहरातूनही अनेक मंडळींनी दुर्गवीरच्या चळवळीत आपला सहभाग घेतला. गेल्या सात-आठ महिन्यांपासून दिवेगडसाताऱ्यातील वर्धनगड या ठिकाणीही संस्थेने काम सुरू केले आहे. ''गडकिल्ले संवर्धनासाठी साहित्य संमेलनसांस्कृतिक सण साजरे करतोमहाराष्ट्र दिनानिमित्त इतिहासाला उजाळा देतोकिल्ले संवर्धन करताना किल्ल्याच्या मूळ बांधकामाला हात लागू नयेवेगळे बांधकाम होऊ नये अशा पुरातत्त्व विभागाच्या अटींचे आम्ही पालन करीत असतो. पुरातत्त्व विभागाने गडप्रेमी संस्थांना सोबत घेतलेतर भविष्यात चांगले काम होऊ शकते,'' असे दुर्गवीरचे अजित राणे सांगतात. जमा झालेल्या निधीतून गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावकऱ्यांना शैक्षणिक साहित्यही पुरविले जाते. गडकिल्ल्यांवर भेटी देताना काढलेल्या छायाचित्रांचेजुन्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यासाठीही दुर्गवीर संस्था प्रयत्नशील असते.
गडकिल्ल्यांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक संस्थेचे एक वेगळे वैशिष्टय आहे. एकमेकांशी स्पर्धा न करता या सर्व संस्था एकत्र येऊन शिवकालीन इतिहास टिकविण्याच्यातो इतिहास पुढच्या पिढीत रुजविण्याच्या मोहिमेला हातभार लावतात. 'गडवाटया संस्थेने गडकिल्ले संवर्धनासाठी काम करणाऱ्या वेगवेगळया 22 संस्थांना एकत्र करून रायगडावर महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी प्रकाशव्यवस्था असावी अशी मागणी केली. पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने स्वच्छताडागडुजी केली. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला. महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी दिवा लावून प्रत्येक सणांची सुरुवात करण्याचा गडवाटचा प्रयत्न असतो,असे सचिव विशाल पेडणेकर सांगतात. प्रत्येक गडकिल्ल्यांवर चौकी पहारा असावायासाठी 'गडवाटनेहमी प्रयत्नशील असते. निव्वळ सहलीसाठी जाणारी असंख्य मंडळी किल्ल्यापर्यंत गाडया नेऊन दारूच्या पाटर्या करतात. यासाठी येथे स्थानिक रहिवाशांनी चौकी उभारावी यासाठी 'गडवाट'चे कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. किल्ल्यांवर येणाऱ्या गाडयांची पाहणी करून मद्य नेण्यास बंदी केलीतरच गडकिल्ल्यांवर सहलीसाठी येणाऱ्या मंडळींवर जरब बसू शकते. आपल्याला कोणी बोलणारे नाही म्हणून गडकिल्ल्यांवर सररास पाटर्या केल्या जातातयाला वेळीच आळा बसला पाहिजे. संस्थेमार्फत 

अनेक मंडळींना सोबत नेऊन त्या गडकिल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले जाते. गडवाटच्या सुरुवातीच्या दिवसात ठरावीक पाच ते सात किल्ल्यांना भेटी द्यायचे ठरविले होते. त्याप्रमाणे कार्यक्रमाचा एक भाग व इतरांना सोबत घेता यावे म्हणून सोशल मीडियावर या कार्यक्रमाची माहिती टाकण्यात आली. याला सर्व ठिकाणांहून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईपुणेनाशिकसातारा अशा शहरांतून गडप्रेमी सहभागी झाले. स्थानिकांना सोबत घेऊन राजगड पाली दरवाजाच्या निखळलेल्या पायऱ्या मातीने भरून काढत गडसंवर्धनाची मोहीम गडवाटने यशस्वीपणे राबविली.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात राहणाऱ्या संतोष माने यांनी गडसंवर्धनासाठी 'गनिमी कावाया ग्रूपची स्थापना केली आहे. वेगवेगळया ग्रूप्सशी संलग् राहणाऱ्या संतोष यांनी इतिहासाचा वारसा असणाऱ्या पन्हाळयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या 13 मित्रांना घेऊन सात वर्षांपूर्वी 'गनिमी कावाया संस्थेची सुरुवात केली. एखाद्या ठिकाणी जाऊन इतिहासाबद्दल जागृती करणेलोकांमध्ये गडकिल्ल्यांबद्दल आत्मीयता निर्माण करणे अशी कामे गनिमी कावामार्फत केली जात असतात. जनतेला आपल्या इतिहासाची थोरवी आपण सांगू शकलोत्याचे महत्त्व उलगडून दाखवू शकलो तर ते गडकिल्ल्यांकडे वळतील व त्यांचे संवर्धन करतील या जाणिवेतून गनिमी कावाचे काम सातत्याने चालत आहे. पन्हाळगडपावनखिंडविशालगडदुर्लक्षित असलेला मुठागड या किल्ल्यांवर त्यांनी आतापर्यंत विशेष मोहीम राबविली आहे. आजही काही किल्ल्यांची शासनदरबारी नोंद नाही. त्यांची नोंद झाली तरच त्यासाठी निधी मिळू शकतो व किल्ल्याच्या विकासासाठीची कामे होऊ शकतात. पुरातत्त्व विभागाला कायद्याच्या चौकटीत राहून सर्व कामे करावी लागतात. पुरातत्त्व विभागासोबत राहूनखास लक्ष देऊन सुरळीत कामे होऊ शकतात असा काही गडप्रेमींचा अनुभव आहे. गडकिल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना दुर्गसंवर्धनाबद्दल प्रबोधन व्हावेया उद्देशाने 'दुर्गसखाया संस्थेची स्थापना केली गेली. मकरंद केतकरमनोज चव्हाणअभिजित काळेचेतन राजगुरूसुबोध पाठक ही मंडळी दुर्गसखामार्फत प्रबोधनाचे काम यशस्वीरित्या करीत आहेत. संस्थेतर्फे दर वर्षी 'दुर्गअभ्यास भ्रमणआयोजित केले जाते. त्या कार्यक्रमादरम्यान गडावर हिंडताना इतिहास अभ्यासक सभासदांना दुर्गांची बलस्थाने व दुर्गांचा इतिहास उलगडून दाखवितात आणि प्रश्नोत्तरादरम्यान शंकांचे निरसन केले जाते. त्या कार्यक्रमाद्वारे राजगडरायगडपुरंदरप्रतापगडशिवनेरी-नाणेघाटसुधागड अशा दुर्गांचा अभ्यास केला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेगवेगळया आदिवासी पाडयांवरील शाळांमधून शिक्षण घेणारी गुणी आदिवासी मुले साक्षरेतेसोबत सुसंस्कृतही व्हावीम्हणून 'दुर्गसखात्या मुलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवीत असतात. त्यामध्ये पाडयांपासून शाळेपर्यंतच्या प्रवासासाठी सायकलीबौध्दिक विकासासाठी शैक्षणिक सीडी आणि दूरदर्शन संचसंगणक साक्षरतेसाठी काही निवडक शाळांमध्ये संगणकविद्यार्थी दत्तक योजनासुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य वाटप,दिवाळीत फराळ आणि फटाके यांचे वाटपगावकऱ्यांच्या आग्रहाखातर ग्रंथालयगरजूंना कपडेवाटप अशी अनेक समाजपयोगी कामे दुर्गसखामार्फत केली जात असतात.
शिवजयंतीप्रमाणेच राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करणाऱ्याही काही संस्था आहेत. शिवअस्मिता या सामाजिक शिवप्रेमी संस्थेमार्फत राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. राजमाता जन्मोत्सव साजरा करण्याचे संस्थेचे हे दुसरे वर्ष. यंदाही या संस्थेमार्फत राजमातांचा जन्मदिन किल्ले कोरीगडावर मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जानेवारी रोजी मुंबईहून कोरीगडाकडे जाण्यासाठी शिवअस्मिता संस्था मार्गक्रमण करणार आहे. या निमित्त गडावरील मंदिरांची साफसफाई,सुशोभीकरण तसेच मंदिराच्या आवारातील परिसरात रांगोळीची आरास करून राजमाता जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
किल्ल्यांची जपणूक व संवर्धन करताना प्राचीन लेण्यांची जपणूक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी डोंबिवलीतील पंकज समेळ या तरुणाने लेण्यांवर खास अभ्यास सुरू केलाआहे. 2006 साली सह्याद्री भ्रमण ग्रूपने राजगडरायगड या किल्ल्यांवर जाऊन साफसफाईचा उपक्रम सुरू केला. गडकिल्ल्यांबाबत सध्या अनेक संस्था जागरूक झाल्या आहेत. अशा वेळी लेण्यांकडे लक्ष द्यावे म्हणून पंकजने आपला मोर्चा लेण्यांकडे वळविला. लेणी आणि किल्ले एकमेकांचा परस्पर संबध सांगत असतात. पुरातन काळातील लोकांचे राहणीमानआभूषणे हे शिल्पात रेखाटण्याची कला वाखाणण्याजोगी आहे. यासाठी अभ्यासवर्ग घेऊन लेण्यांचे माहात्म्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा पंकजचा मानस आहे.

या ऐतिहासिक वास्तूंची जपणूक झालीस्थानिक याबाबत जागरूक झालेतर पर्यटन मार्गदर्शकस्थानिक दुकानदार यांना यातून रोजगार मिळू शकेल. गडांवरील कचराअस्वच्छता ही गंभीर समस्या होत आहे. पुरात्तत्व विभागाच्या कालबाह्य अटींचा फेरविचार व्हायला हवा. असे झाले तर स्वयंसेवी संस्थांना गडसंवर्धनाचे काम सजगतेने करता येईल. पर्यटकांनी गडकिल्ल्यांवर स्वच्छता ठेवायला हवीमंदिराप्रमाणे गडाचे पावित्र्य जपायला हवे. बहुतांश किल्ल्यांची पडझड झालेली सध्या दिसून येते व त्याकडे पुरातत्त्व विभागाचे झालेले दुर्लक्षही तेवढेच कारणीभूत आहेअसे काही गडप्रेमींचे गाऱ्हाणे असते. पण एखादी ऐतिहासिक वास्तू दुरुस्त करायची असेल तर ती वास्तू कोणत्या कालखंडात बांधली आहेत्याच्या जतनासाठी कोणत्या प्रकारचे बांधकाम योग्य असेल याचा सारासार विचार करणे ही तितकेच गरजेचे आहेअसे मत ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ आणि पुरातत्त्व विभागाचे निवृत्त संचालक अरविंद जामखेडकर यांनी व्यक्त केले. स्मारक दत्तक
योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्था अशी कामे करू शकतात. काही किल्ल्यांसाठी लागणारा निधी केंद्रातून येत असतो
तर काही किल्ल्यांवर राज्य सरकारचे नियंत्रण असते. एखाद्या वास्तूच्या डागडुजीसाठी व पुनर्बांधणीसाठी लागणारा निधी विशिष्ट खात्यात जमा करुन त्यावर संबंधित विभाग काम करतो किंवास्थापत्य विभागाकडे हे काम सोपविले जाते. सरकारस्थानिक माणसे काय करतात यापेक्षा आम्ही वेळात वेळ काढून गडकिल्ल्यांना भेटी देऊन तिथे स्वच्छताडागडुजी करतोअसे सामाजिक संस्थांचे सांगणे आहे. पुरातत्त्व विभागाने अशा सेवाभावी मंडळींची मदत घेत कार्य चालू ठेवलेतर या ऐतिहासिक वास्तूंची आपल्याला जपणूक करता येईल.
9773770507

एखादी ऐतिहासिक वास्तू दुरुस्त करायची असेल तर ती वास्तू कोणत्या कालखंडात बांधली आहेत्याच्या जतनासाठी कोणत्या प्रकारचे बांधकाम योग्य असेल याचा सारासार विचार करणेही तितकेच गरजेचे आहे. एखाद्या वास्तूच्या डागडुजी व पुनर्बांधणीसाठी लागणारा निधी विशिष्ट खात्यात जमा करून त्यावर संबंधित विभाग काम करतो किंवास्थापत्य विभागाकडे हे काम सोपविले जाते.
अरविंद जामखेडकर (ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ आणि पुरातत्त्व विभागाचे निवृत्त संचालक)

No comments:

Post a Comment