Saturday, 22 February 2014
प्रथमेश परबच्या हस्ते ‘स्टडी लव्ह सेक्स धोका’ चे प्रकाशन
टाइमपास आणि बालक पालक या दमदार चित्रपटांमुळे प्रथमेश परब हा तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याच्या या चित्रपटातील भुमिकांमुळे कॉलेज कट्ट्यावरची मुल ही ‘स्टडी लव्ह सेक्स धोका’ या विषयावर खुलेपणाने बोलायला आणि सकारात्मक विचार करायला लागली आहेत. याच विषयावर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन विशु आणि दगडु अशी ओळख असणाऱ्या प्रथमेश परबच्या हस्ते करण्यात आले. ‘स्टडी लव्ह सेक्स धोका ही कादंबरी आजच्या पिढीचं जगणं नेमकेपणाने जसं आहे तसं मांडते. पौगंडवयीन मुला-मुलींच्या भावविश्वाचं वर्णन करताना याच पिढीच्या भाषेत ही कादंबरी बोलते. कादंबरीतील ही बोल्ड पण तितकीच सोपी भाषा वाचकाच्या ह्रदयाला भिडणारी आहे,’ असं मत बालक-पालक आणि टाइमपास सिनेमांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेलेला युवा अभिनेता प्रथमेश परब याने व्यक्त केलं. सुरेन करंबे यांनी लिहिलेल्या ‘स्टडी लव्ह सेक्स धोका’ या कादंबरीचं प्रकाशन प्रथमेश परब याच्या हस्ते झाले. त्यावेळी तो बोलत होता. याप्रसंगी बालकपालकचे लेखक अंबर हडप, लेखक सुरेन करंबे, नवता बुक वर्ल्डचे प्रकाशक कीर्तिकुमार शिंदे आणि प्रवीण धोपट उपस्थित होते. दादर पश्चिम येथील धुरु सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अभिनेता प्रथमेश याने तरुणांच्या दृष्टिकोनातून अभ्यास, प्रेम, सेक्सविषयी आपली मतं मोकळेपणाने मांडली. मला विशु आणि दगडुच्या भुमिकेतच पहायला चाहत्यांना आव़डलय पण या भुमिकेतुन बाहेर येत मला पुस्तकाविषयी बोलायचय असे म्हणत प्रथमेशने चाहत्यांची सुरुवातीस परवानगी घेतली. ‘प्रेमासोबत जबाबदारीची जाणीव निर्माण व्हायला हवी, आणि प्रेमात असतानाही आपल्या ध्येयाचा विसर पडू देऊ नये. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर मुलींशी संवाद साधला जातो, त्याप्रमाणे मुलांशीही संवाद साधायला हवा. स्टडी लव्ह सेक्स धोका या कादंबरीत असा संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे’, असंही मत प्रथमेशने व्यक्त केलं. बालकपालक चित्रपटात सेक्स, धोका तर टाईमपास चित्रपटात स्टडी, लव्ह याविषयी सांगण्यात आले आहे. हे पुस्तक म्हणजे या दोन चित्रपटातला ब्रिज असल्याचेही तो म्हणाला.बालकपालक सिनेमाचे लेखक अंबर हडप कादंबरीविषयी आपलं मत व्यक्त करताना म्हणाले, ‘स्टडी लव्ह सेक्स धोका हे नाव थोडंसं नकारात्मक वाटत असलं तरी अत्यंत सकारात्मक विचार मांडणारी ही कादंबरी आहे. विशेष म्हणजे लेखकाने पौगंडवयीन मुलामुलींच्या जीवनातील घटनांचं वर्णन करताना अनेक पैलूंनी आणि दृष्टिकोनांतून प्रसंगांची मांडणी केली आहे. कादंबरीतील भाषाशैली अत्यंत प्रवाही आणि साधीसोपी असल्यामुळे तिचा वाचकाच्या मनावर प्रभाव पडतो.’
Subscribe to:
Post Comments (Atom)
.jpg)
No comments:
Post a Comment